कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद), यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने एक दिवसीय नैसर्गिक शेती कार्यशाळा  ता. कळंब येथे संपन्न. 30.08.2022

कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ-१ व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद), यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने दि ३० -०८-२०२२ रोजी एक दिवसीय नैसर्गिक शेती कार्यशाळा  ता. कळंब येथे संपन्न.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक तसेच प्रमुख अतिथी व मार्गदर्शक मा.  शुभ्रकांत भगत, तालुका कृषी अधिकारी, कळंब व उमेद चे श्री. भास्कर कुमरे, तालुका अभियान व्यवस्थापक, कळंब  मान्यवर  उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनामधे  मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी जमिनीचा सेंद्रिय कर्ब नैसर्गिक पद्धतीने कसे वाढवावा या विषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच पिकाचे उत्पादन वाढविण्याकरिता सेंद्रिय खतांचा वापर असे अवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर  मा. श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण,  कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी नैसर्गिक शेती कार्यशाळाचे  महत्त्व  व उद्देश या प्रंसगी विषद केले. 

कार्यक्रमाचे अतिथी तथा मार्गदर्शनापर मा.  शुभ्रकांत भगत, तालुका कृषी अधिकारी, कळंब यांनी कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध  असलेल्या शासकीय योजनांची सखोल माहिती दिली.

याप्रसंगी उमेद चे श्री. भास्कर कुमरे, तालुका अभियान व्यवस्थापक, कळंब यांनी उमेद अंतर्गत असलेल्या कार्याचा आढावा बद्दल मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रात डॉ. प्रमोद मगर,  शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ  यांनी रसायन विरहित कीड व्यवस्थापन या विषयी सखोल माहिती दिली तसेच दशपर्णी अर्क व निम अर्क यांचे तयार करण्याची पद्धत या विषयी मार्गदर्शन केले.

डॉ. गणेश काळूसे, शास्त्रज्ञ, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र,  कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी स्वयं रोजगार निर्मिती करींत  शेतीला पूरक व्यवसाय कुकुटपालन व  शेळीपालन   या विषयी सखोल माहिती दिली.

 श्री. राहुल चव्हाण,  शास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिकी, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी सुधारित कृषी अवजारांचा पिक लागवडीकरिता उपयोग व रुंद सरी वरंबा लागवड पद्धतीचे महत्त्व या विषयी मार्गदशन केले.  

            सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रजनी जाधव, तालुका व्यवस्थापक, उमेद, कळंब  यांनी केले तर श्री. नितीन गायकवाड, प्रभाग समन्वयक (सेंद्रिय )यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास उमेदचे  सर्व तालुका व्यवस्थापक व सर्व प्रभाग समन्वयक, कृषी सखी, पशु सखी, उद्योग सखी इ. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *