भारतीय कृषि अनुसंधान परिषद व केंद्रीय कापुस संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ अंतर्गत शुक्रवार दि, २९ऑगस्ट २०२५ रोजी बाभूळगाव येथील शेतकरी श्री भानुदास बेलेकर यांच्या शेतावर एकदिवशीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला यावेळी मोठया प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
विदर्भातील प्रमुख पिक कापसाच्या उत्पादन क्षेमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने यवतमाळ जिल्ह्यातील, यवतमाळ, राळेगाव, कळंब, बाभुळगाव, आर्णी, पांढरकवडा, मारेगाव, वणी, आणि घाटंजी या ९ तालुक्यात कृषि अनुसंधान परिषद व केंद्रीय कापुस संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ-१ अंतर्गत अति सघन लागवड प्रकल्प राबविल्या जात आहे.
या प्रकल्पामध्ये कापसाच्या उत्पादन वाढीसाठी सघन व अतिसघन आणि दादा लाड कापुस लागवड तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांपर्यंत प्रचार व प्रसार व्हावा या दृष्टीने एकदिवसीय शेती दिनाचे आयोजन करण्यात आले तसेच कृषि संवादिनी व कामगंध सापळ्याचे वितरण करण्यात आले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रमोद मगर, विषय विशेषज्ञ(किटकशास्त्र)कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ, श्री राहुल चव्हाण विषय विशेषयज्ञ अभियांत्रिकी, तसेच श्री. मयूर ढोले विस्तार शिक्षण विभाग कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ तसेच कु शिवानी बावनकर, रविंद्र राठोड, गौरव येलकर, नयन ठाकरे, अमोल वाळके .श्री मुकेश देशमुख, श्री भानुदास बेलेकर (प्रगतीशील शेतकरी) बाभूळगाव उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन रविंद्र राठोड यांनी केले.
श्री राहुल चव्हाण (शास्त्रज्ञ अभियांत्रिकी) यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करत, अतिसंघन कापूस लागवड पद्धतीमध्ये न्यूम्याटीक प्लॅन्टरचा वापर शेतकऱ्यांसाठी कश्या प्रकारे फायदेशीर ठरत आहे या बदल विषयी सखोल मार्गदर्शन केले . या यंत्राचा वापर करून बी योग्य खोलीत अचूकपणे सोडण्यास मदत होते. तसेच एकसमान रोपे उगवतात आणि पेरणी सोबत प्रारंभिक खताचा पुरवठा करणे देखील श्यक्य होतेया करीता आधुनिक शेतीसाठी यांत्रिकीकरणाची साथ घ्यावी या विषयी सखोल मार्गदर्शन केले.
तांत्रिक सत्रामध्ये डॉ. प्रमोद मगर यांनी प्रकल्पाचा उद्देश, अति सघन लागवड तंत्राज्ञान शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदेशीर होत आहे व कृषि विज्ञान केंद्रामार्फत या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या कार्याची विस्तृत माहिती दिली. सोबतच कपाशीवरील कीड व रोग व्यवस्थापन, पिवळे-निळे चिकट सापळे व ट्रायको कार्डचे महत्त्व पटवून दिले.
तांत्रिक सत्रामध्ये श्री मयूर ढोले (विस्तार शिक्षण विभाग) यांनी कृषी विज्ञान केंद्रांमार्फत (KVK) शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद, हवामान-बदल-प्रतिबंधक शेती आणि इतर नवीन तंत्रज्ञानाविषयी जागरूकता निर्माण करून शेतीच्या पद्धती सुधारल्या जातात, ज्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण समुदायांचे ज्ञान व कौशल्ये वाढतात या बदल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र राठोडयांनी केले तर आभार श्री राहुल चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्या-करिता शिवानी बावणकर YP-2, नयन ठाकरे YP-1, अमोल वाळके YP-1 यांनी परिश्रम घेतले.






