विशेष कापूस प्रकल्पा अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ-१ अंतर्गत मावळणी ता. कळंब येथे एक दिवसीय शेतकरी प्रक्षेत्र दिन कार्यक्रमाचा आयोजन.29.10.2025

भारतीय कृषि अनुसंधान परिषद व केंद्रीय कापुस संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ अंतर्गत शुक्रवार दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी मावळणी ता. कळंब येथील शेतकरी श्री सुखदेव राहुल अवसरे यांच्या शेतावर प्रक्षेत्र दिन कार्यक्रम पार पडला यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याऱ्यांची उपस्थिती होती.

विदर्भातील प्रमुख पिक कापसाच्या उत्पादन क्षेमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने यवतमाळ जिल्ह्यातील, यवतमाळ, राळेगाव, कळंब, बाभुळगाव, आर्णी, पांढरकवडा, मारेगाव, वणी, आणि घाटंजी या ९ तालुक्यात कृषि अनुसंधान परिषद व केंद्रीय कापुस संशोधन संस्था, नागपूर वांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ-१ अंतर्गत अति सघन लागवड प्रकल्प राबविल्या जात आहे.

या प्रकल्पामध्ये कापसाच्या उत्पादन वाढीसाठी सघन व अतिसघन आणि दादा लाड कापुस लागवड तंत्रज्ञानाचा शेतक-यांपर्यंत प्रचार व प्रसार व्हावा या दृष्टीने एकदिवसीय शेती दिनाचे आयोजन करण्यात आले तसेच कृषि संवादिनी व कामगंध सापळ्याचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. दीपक कचवे वारिष्ट शास्त्रज्ञ व प्रमुख कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ, डॉ. प्रमोद मगर विषय विशेषज्ञ (किटकशाख) कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ, श्री राहुल चाहाण विषय विशेषयज्ञ (अभियांत्रिकी), मयूर डोले विस्तार शिक्षण विभाग कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ, कु दिपाली जामुलकर (सरपंच, मावळणी), श्री सुदर्शन पतंगे (नुझिवीडू सीड्स), तसेच कु शिवानी बावनकर, रविंद्र राठोड, गौरव येलकर, नयन ठाकरे, अमोल वाळके, उपस्थित होते.

श्री राहुल चव्हाण (शास्रज्ञ अभियांत्रिकी) यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करत, अतिसंघन कापूस लागवड पद्धतीमध्ये न्यूम्याटीक प्लॅन्टरचा वापर शेतकऱ्यांसाठी कश्या प्रकारे फायदेशीर ठरत आहे या बदल विषयी सखोल मार्गदर्शन केले. या यंत्राचा वापर करून बी योग्य खोलीत अचूकपणे सोडण्यास मदत होते. तसेच एकसमान रोपे उगवतात आणि पेरणी सोबत प्रारंभिक खताचा पुरवठा करणे देखील श्यक्य होतेया करीता आधुनिक शेतीसाठी यांत्रिकीकरणाची साथ घ्यावी या विषयी सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. दीपक कचवे वरिष्ट शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शेतकऱ्यांना कापूस पिकाच्या लागवड पध्दती बद्दल सविस्तर माहिती दिली. लागवडीसाठी योग्य अंतर व मुलभूत अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे बोडाची संख्या व आकार वाढवुन उत्पादनरात वाढ होते. आणि मातीच्या प्रकारानुसार शेतकऱ्यानी कोणते लागवड अंतर निवडावे या बाबत व कापूस पिकाचे कमी खर्चीक व्यवस्थापन या विषयी सखोल मार्गदर्शन केले.

तांत्रिक सत्रशमध्ये डॉ. प्रमोद मगर यांनी प्रकल्पाचा उद्देश, अति सपन लागवड तंत्राज्ञान शेतक-यांना कशाप्रकारे फायदेशीर होत आहे व कृषि विज्ञान केंद्रामार्फत या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या कार्याची विस्तृत माहिती दिली. सोबतच कपाशीवरील कीड व रोग व्यवस्थापन, पिवळे निळे विकट सापळे व ट्रायको कार्डचे महत्व पटवून दिले.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *