कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ द्वारे विशेष कापूस प्रकल्प अंतर्गत शेतकरी मेळावा ०८.०१.२०२५

               भा.कृ.अनु.प. केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर, भा.कृ.अनु.प. अटारी पुणे आणि पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ -१ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कापूस प्रकल्प २०२४-२५ अंतर्गत दिनांक ०८/०१/२०२५ रोजी यवतमाळ जिलहयातील कळंब तालुका येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिति म्हणून मा. डॉ. सुरेश नेमाडे, विस्तार कृषिविद्यावेत्ता. श्री मयूर ढोले प्रभारी वरिष्ट शास्त्रज्ञ व प्रमुख कृ.वि.के यवतमाळ, डॉ. प्रमोद मगर, विषय विशेषज्ञ (कीटकशास्त्रज्ञ), मा.डॉ.गणेश काळूसे विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) श्री राहुल चव्हाण विषय विशेषज्ञ (कृषि अभियांत्रिकी). ईश्वर उत्तमराव (कृषि पर्यवेक्षक,कळंब) श्री. विष्णु गायकवाड (बी.टी.एम) कृ. शिवानी बावनकर (YP-II), श्री गौरव येलकर (YP-I), श्री अमोल वाळके (YP-I), कु. प्राची नागोसे (YP-I), श्री नयन ठाकरे (YP-I), श्री रविंद्र राठोड (YP-I). श्री समीर वड्याळकर (अंकुर सिड्स), श्री सुदर्शन पतंगे (नुजीविडू सिड्स), श्री सलमान पठाण (प्रभात सिड्स), श्री तेजस आंबेकर (रासी सिड्स), श्री राजू शेळके (रासी सिड्स) उपस्थित होते. तसेच शेतकरी मेळाव्यामध्ये श्री वसंतराव विलराव विठ्ठलराव इंगोले (प्रगतिशील शेतकरी) यांच्या प्रक्षेत्रावर राष्ट्रिय अन्न सुरक्षा मिशन अंतर्गत विशेष कापूस प्रकल्पामध्ये अति सघन व सघन लागवड तंत्रज्ञान या विषयावर किसन मेळावा संपन्न झाला. यावेळी २०० पेक्षा जास्त  शेतकऱ्यांची उपस्तिथी होती.

            कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. सुरेश नेमाडे  यांनी हल्ली उद्भवणारे आसमानी संकट जसे हवामान बदल, तापमान वाढ, व अतिवृष्टी या पासून शेतीचे होणारे नुकसान टाळण्याकरीत शेतककऱ्यांनी काय उपाय योजना केल्या पाहिजे या बाबद सखोल मार्गदर्शन केले. डॉ.प्रमोद मगर, विषय विशेषज्ञ (कीटकशास्त्रज्ञ) यांनी विशेष कापूस प्रकल्पा बद्दल माहिती देत असतांना एकात्मिक किड व्यवस्थापण, गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन व फवारणी करताना कोणत्या प्रकरची काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले, तसेच निळे व पिवळे चिकट सापळे आणि ट्रायकोकार्ड बद्दल माहिती दिली. सोबतच एकात्मिक किड व रोग व्यवस्थापनेचे महत्व शेतकर्यांना समजावून दिले. श्री वसंतराव विठ्ठलराव इंगोले (प्रगतिशील शेतकरी) यांनी व अनेक शेतकऱ्यांनी सघन व अति संघन लागवड तंत्रज्ञानबद्दल आपले अनुभव व्यक्त केले.

          सुत्रसंचालन प्राची भा. नागोसे, तर आभार प्रदर्शन मा.डॉ.गणेश काळूसे विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वानीच योगदान दिले. कार्यक्रमानंतर कृषि संवादिनी व बॅग वितरित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *