कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ (डॉ पं .दे.कृ.वि., अकोला ) व तालुका कृषी अधिकारी, कळंब (कृषी विभाग ) यांचे संयुक्त विद्यमाने दि. १७-१०-२०२२ रोजी ता. कळंब येथे पी एम किसान सन्मान सम्मेलन कार्यक्रम संपन्न.
याप्रसंगी मा. श्री. नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत सरकार व केंद्रीय कृषी मंत्री श्री. नरेंद्रसिंह तोमर, भारत सरकार यांचे, मा. डॉ. मनसुख मांडविया, मा. केंद्रीय रसायने आणि खते, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांनी शेतकऱ्यांना केलेल्या संबोधनाचे थेट प्रेक्षपण करण्यात आले.
मा. श्री. नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत सरकार यांनी केलेल्या पी एम किसान अंतर्गत १२ व्या हप्ता प्रकाशन, भारत युरिया खत, ॲग्री स्टार्टअप कोन्क्लेव चे उद्दघाटन थेट प्रेक्षणाद्वारे दाखवण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ (डॉ पं .दे.कृ.वि., अकोला ) व तालुका कृषी अधिकारी, कळंब (कृषी विभाग ) यांचे संयुक्त विद्यमाने रब्बी हंगामापूर्वी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, तर प्रमुख अतिथी मा. श्री. शुभ्रकांत भगत, तालुका कृषी अधिकारी, कळंब उपस्थित होते.
या वेळी उपस्थित शेतकरी बांधवाना मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी रब्बी हंगाम पिकातील प्रमुख पिक हरभरा व गहू पिकांच्या सुधारित वाण लागवडी विषयी सखोल मार्गदर्शन केले.
प्रमुख अतिथी मा. श्री. शुभ्रकांत भगत, तालुका कृषी अधिकारी, कळंब यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांन विषयी माहिती दिली.
कर्यक्रमाच्या तांत्रिक सत्रामध्ये डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र यांनी रब्बी हंगामातील पिकांचे कमी खर्चिक कीड व रोग व्यवस्थापन व कापूस पिकातील गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन, श्री. राहुल चव्हाण, शास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिकी यांनी सुधारित यांत्रिकीकरण (बी बी एफ, ड्रोन ), श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण यांनी कृषी विज्ञान केंद्राचे महत्व व कार्य प्रणाली या विषयी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. व्ही. के. गायकवाड, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन, कळंब तर आभार श्री. महेंद्र ओंकार, कृषी सहायक, कळंब यांनी केले.